Pharmacy admission 2025: फार्मसी प्रवेश यंदाही विलंबाने; तीन वर्षांपासून वेळापत्रक ढासळलेलेच, नेमकं कारण काय?

Pharmacy admission 2025 Maharashtra : महाराष्ट्र फार्मसी (Maharashtra Pharmacy) प्रवेश 2025 मध्ये उशीर होण्याची शक्यता आहे. ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’ (Pharmacy Council of India) च्या मान्यता प्रक्रियेला विलंबामुळे हा अडथळा निर्माण झाला आहे. महाविद्यालयांना मान्यता देण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेश परीक्षांचे निकालानंतरही प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.

Maharashtra Pharmacy admission 2025 : देशभरातील फार्मसी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशांना गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाही विलंब होण्याची शक्यता आहे. ‘फार्मस कौन्सिल ऑफ इंडिया’ने (पीसीआय) देशभरातील शिक्षण संस्थांना मान्यता प्रक्रिया राबविण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत दिली आहे. प्रवेश परीक्षांचा निकाल जाहीर झाला तरी मान्यता प्रक्रिया होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रियेला अडसर येणार आहे.

‘पीसीआय’ मार्फत ११ जूनला एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मान्यता प्रक्रिया राबविण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचे या परिपत्रकात नमूद केले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत असलेली ही मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे ‘पीसीआय’ने जाहीर केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ९ मे च्या आदेशानुसार हा निर्णय जाहीर केल्याचे ‘पीसीआय’चे सचिव अनील मित्तल यांनी जाहीर केले आहे.

२०२२ पासून ‘पीसीआय’ने देशभरातील फार्मसी पदवी, पदव्युत्तर तसेच पदविका अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची तपासणी व मान्यता प्रक्रिया सुरू केली होती. प्रवेश प्रक्रियेचा अंदाज घेऊन महाविद्यालयांचे मान्यता नूतनीकरणाचे काम साधारणतः मार्च-एप्रिलपर्यंत संपणे गरजेचे असते. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून फार्मसी महाविद्यालयांच्या मान्यता व मान्यता नूतनीकरणाबाबत ‘पीसीआय’ मार्फत मोठ्या प्रमाणावर ढिसाळपणा सुरू आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात न घेता ही प्रक्रिया राबविली जात आहे. यंदाही याच प्रकाराची पुनरावृत्ती होत आहे. आता ही मान्यता प्रक्रिया सप्टेंबरअखेरपर्यंत राबविली जाणार आहे. त्यामुळे अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत यंदाही फार्मसी अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष सुरू होण्यास विलंब होणार आहे.

  • विलंबामुळे गेल्या तीन वर्षांपासून फार्मसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी.
  • बारावीनंतर पदवी किंवा पदविकेसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिले सत्र म्हणजे या अभ्यासक्रमाचा पाया असतो.
  • मात्र यासाठी कालावधीच कमी मिळत असल्याने फार्मसीच्या विद्याथ्यांचा पायाच कच्चा राहात आहे.
  • याबाबत ‘पीसीआय’ मात्र कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे आतापर्यंत वारंवार दिसून आले आहे.

“प्रवेश प्रक्रिया लांबल्याने सर्वाधिक नुकसान विद्यार्थ्यांचे होत आहे. पालकही तणावात असतात. फार्मसीचे प्रवेश वेळेवर होत नसल्याने इच्छा असूनही विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत. गेल्या दोन वर्षात अशा अनेक विद्याथ्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला आहे. दरवर्षी असेच सुरू राहिले तर लवकरच फार्मसी अभ्यासक्रमाकडे येणारा विद्यार्थ्यांचा ओघ कमी होईल. ‘पीसीआय’ने मान्यता प्रक्रिया लवकर पार पाडण्याची गरज आहे.”
– डॉ. संतोष तांबे, प्राचार्य, एमजीव्ही फार्मसी महाविद्यालय

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा अयोग: संयुक्त पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ही परीक्षा दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर घेण्यात …

(MAHARASHTRA POLICE BHARTI) महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र सरकारने अखेर पोलीस भरती 2025 जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून भरती रखडलेली असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *